Sunday, April 17, 2011

अमृतकलश 2

आपल्या योग्यतेपेक्षा जास्त मागण्याची आणि न मिळाल्यास नास्तिकतेकडे झुकण्याची मानवी मनाला सवय असते. त्याचा तो स्वभावधर्म आहे व हेच त्याच्या दुःखाचे मूळ कारण आहे. तो विकासाकडे कमी आणि विकाराकडे जास्त झुकतो.त्यामुळे त्याच्यात अपुरेपणा राहतो.तो दुःख भोगतो. यात ईश्वराचा दोष कुठेही नाही. ही शक्ती कधीही मानवाला दुःख देणार नाही.ती तर चिन्मयानंद अशी शक्ती आहे.